समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र
समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र ही साहित्य, संस्कृती आणि सामाजिक समरसतेच्या मूल्यांचा प्रसार करणारी एक नोंदणीकृत संस्था आहे. "सरस ते साहित्य, समरस तो साहित्यिक" या ब्रीदवाक्यासह साहित्याच्या माध्यमातून समाजात समता, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्यासाठी परिषद सातत्याने कार्यरत आहे. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये नियमितपणे समरसता साहित्य संमेलने, कविसंमेलने, परिसंवाद, व्याख्याने, कार्यशाळा तसेच विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन समरसता साहित्य परिषदेच्या वतीने होते. प्रस्थापित साहित्यिकांसह नवोदित लेखक, कवी आणि विद्यार्थ्यांना आपली साहित्यिक प्रतिभा सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.